• Home
  • आजच्या बातम्या
  • बीड जिल्ह्यात खळबळ! विवाहित तरुणीचे अपहरण करून अत्याचार; आरोपीला अटक
Image

बीड जिल्ह्यात खळबळ! विवाहित तरुणीचे अपहरण करून अत्याचार; आरोपीला अटक

बीड : जिल्ह्यातील हिवरा पहाडी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातीलच एका विवाहित तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच वैभव पटेकर या तरुणाने रात्रीच्या सुमारास संबंधित विवाहित तरुणीला जबरदस्तीने उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतक्यावरच न थांबता पहाटेच्या सुमारास आरोपीने पीडितेला गावातील चावडीला बांधून ठेवले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सकाळी गावातील नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली..

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाणे येथे आरोपी वैभव पटेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे गावासह संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Releated Posts

संतोष देशमुख प्रकरण: मुख्य आरोपी वाल्मिक कराडची तुरुंगात प्रकृती खालावली; न्यायालयीन लढाईवर काय परिणाम?

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात गेले काही महिने चर्चेत असलेल्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता एक नवीन आणि धक्कादायक…

ByByAkash pawar May 20, 2026

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा पेच सुटला: बहुप्रतीक्षित महामंडळ वाटपाचा मार्ग मोकळा!

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला आणि सत्तेतील घटक पक्षांमध्ये (भाजप, शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट…

ByByAkash pawar May 20, 2026

भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका: नागरिक सुरक्षित की भीतीच्या छायेत? – मनेका गांधींच्या भूमिकेचे विश्लेषण

आजकाल आपल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा सकाळी किंवा संध्याकाळी…

ByByAkash pawar May 20, 2026

उल्हासनगर हादरले! तरुणीच्या गंभीर आरोपांनी पोलीस दलात खळबळ: न्याय मिळणार का?

”’उल्हासनगर हादरले! तरुणीच्या गंभीर आरोपांनी पोलीस दलात खळबळ: न्याय मिळणार का?”’ उल्हासनगर शहरातील वातावरण सध्या एका गंभीर प्रकरणामुळे…

ByByAkash pawar May 20, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top